जिवन
जगण्याचा वीट येऊ नये म्हणून
वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर
ठेऊ नका डोळा
एकञ या गोड बोला
मार्ग निघतील सोळा
नाते संबंध बिघडण्याचे
हे एक मुख्य कारण
आपल्याच माणसाचं
करु नये वस्ञहारण
योग्य वाटे केल्यामुळे
नाते टिकुन राहातील
कार्य प्रसंगी बहीण -भाऊ
जवळ जवळ येतील
दु:ख,चिंता आणि क्लेश
नक्की होतील कमी
आरोग्य उत्तम राहण्याची
थोडी फार हमी
येणे जाणे खुंटले की
माणूस विचार करतो
म्हणून तर आपला बी,पी,
खाली वर होतो
डॉक्टर देतात गोळ्या
पण विचार कसे जातील
E.C.G.मधल्या रेषा कशा
पाहिजे तशा येतील ?
त्यातून पुढे छातीत कळ
किंवा पॅरालिसिस
उगी कशाला चान्स देता
शुगर नावाच्या घुशीस
पैसा अडका प्लॉट शेती
करता कशासाठी
एक किंवा दोन लेकर
प्रत्येकाच्या पोटी
प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा
माणसं करावीत गोळा
नाती गोती जपून ठेवावी
करु नये चोळा मोळा
क्वालिफाईड गडगंज
झालात म्हणे तुम्ही
पुतणे,भाच्चे सोडून देऊन
करता टॉमी जिमी
कुञं प्रामाणिक असलं तरी
बोलता येत नसतं
मन हलकं करण्यासाठी
जिवंत माणूस लागतं
रिलेशन जपल्यामुळे
गोळया होतील कमी
दीर्घ आयुष्य मिळण्याची
होती एक हमी
भावाकडे जात जा
आणि बहिणालाही बोलवा
वहिनीला मान देऊन
सा-यांची मनं फुलवा
अरे वेडया याच्यामुळेच
नेहमी राहशील फिट
जगण्याचा तुला कधीच
येणार नाही वीट
माणूस
माणूस दिसायला
इतका खराब नसतो
जितका तो
आधार कार्ड वर दिसतो
अन्
इतका देखणा ही नसतो
जितका तो
वोट्सअपच्या डिपी मध्ये दिसतो
माणूस इतका वाईट पण नसतो
जितका त्याची बायको समजते
अन् इतका चांगला पण नसतो
जितकी त्याची आई सतजते
पण तो नक्की कसा असतो ?
हे फक्त त्याच्या
मिञांनाच ठाऊक असते